Breking News

मंगळवार, १३ जानेवारी, २०१५

स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद
सन्मानीय व्यासपीठ आदरणीय गुरूजन व येथे जमलेल्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आज मी स्वामी विवेकानंदबद्दल जे काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचीतेने ऐकावे अशी मी नम्र विनंती करतो.
 इ.स. 1893 मधे अमेंरिकेत शिकागो येथे भरलेल्या, जागतीक सर्व धर्म परिषदमधे माझ्या प्रिय बंधु आणि बघिनीनो असे उदगार काढून विश्व बन्धुत्वाचे नाते प्रस्थापित करणारे स्वामी विवेकानंद कोणाला बरे परिचित नाही. आपण त्याना स्वामी विवेकानंद ह्या नावाने ओळखत असलो तरी त्यांचे मूळ नाव नरेंद्र असे होते १२ जानेवारी १८६३ ह्या दिवशी त्यांचा जन्म झाला.त्यांचा वडिलांचे नाव विश्वनाथ बाबु व आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते. त्यांचे वडील व्यवसायाने वकील होते, त्याचा स्वभाव उदार व दुःखीन विषयी कणव असणारा होता. आई भुवनेश्वरी देवी बुद्धिमान व वृतीने धार्मिक होत्या. अश्या मात पिताने नरेन्द्रांवर उत्तम संस्कार करुण त्यांचा वृत्ती घडविल्या. लहानपणी बाल नरेंद्र फार खोड़कर होते. त्याना विविध खेळाची आवड होती. त्यांचा वडिलांनी त्यांना थोर समाज सुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर ह्यांच्या शाळेत घातले. तेथेही नरेन्द्रांवर उत्तम संस्कार घडले. १ में १८९७ रोजी त्यानी रामकृष्ण परिवाराची बैठक बोलावून जनतेच्या उद्घारासाठी सेवासेना उभारण्याचे आपले स्वप्न बोलून दाखवले, हां विचार सर्वांमधे पटला. व रामकृष्ण परमहंस मिशनची स्थापना झाली. निरनिराळया धर्माच्या अनुयामधे बंधुभाव उत्पन्न व्हावा ह्यासाठी रामकृष्ण परमहंसानी केलेल्या कार्याची धुरा ह्या मिशनने खांद्यावर
 घेतली अवघे ३९ वर्षाचे आयुष्य स्वामी स्वामी विवेकानंदाना लाभले. पण ह्या अल्पावधित त्यानी युगानुयुगाचे प्रचड कार्य केले. त्यानी पाश्चिमात्य देशात बहुतीक वादाचा भारतीय अध्यात्म वादाशी समन्वय साधन्याचा पर्यत्न केला. भारताच्या थोर संस्कृतिच्या व उदात्व मानवतावादी तत्वज्ञानाचा जगाला परिचय करुण देण्याचे महान कार्य करुण स्वामी विवेकानंदानी भारताच्या भावी पिढ्यांसाठी एक थोर आदर्श व वारसा ठेवला आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द् संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र.......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा